वर्ग ४ पर्यंत असलेली शाळा वर्ग ८ पर्यंत झाली आणि वर्ग ९ व १० करिता प्रशासकीय पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांत गुणात्मक बदल होऊ लागले.२२ असलेली विद्यार्थी संख्या १८२ वर पोहोचली आणि शाळेत हाऊसफुल्ल चा फलक लागला. स्वतः गावातून कुदळ,खोरे जमा करून विद्यार्थ्यांच्या मदतीने सलग ६ वर्ष पहाड खोदून शाळेसमोरील जागा समतल बनवली. जंगलातून लाकडे आणून गावातुन जुन्या साड्या जमा करून त्यांच्या सहाय्याने शाळेची संरक्षण भिंत तयार केली. शाळेला पुरेसे पटांगण नसल्याने तिन्ही गावाच्या मधोमध असलेल्या रस्त्यावर पहाटे अंधारात त्यांच्या योग्य मार्गदर्शनात मुलांना धावणे, योगासने सह खोखो,कबड्डी,अथलटिक्स चे खेळाडू तयार केले.अज्ञात असलेली पालडोह ची शाळा जिल्हा, राज्यस्तरावर झेंडे फडकवून राज्यातील ३६५ दिवस चालणारी एकमेव शाळा म्हणून ओळखू लागली.
सण,उत्सव व शासकीय सुट्टयात तर १८२ विद्यार्थ्यांना
शिकविण्याची जबाबदारी एकट्या राजेंद्र परतेकी सरांचीच त्यावर ही मार्ग काढून विद्यार्थ्यांच्याच सहकार्याने विद्यार्थ्यांना शिकविले जाते.मोठी मुलं लहान मुलांना शिकवितात कधीकधी एखादं चिमुकलाही आपल्याच वर्गाना शिकविताना दिसतो.कोविड काळात सतत दोन्ही वर्षी शाळेतील मुलानी आपला अभ्यासक्रम ऑक्टोबर महिन्याच्या आधीच पूर्ण केला होता. ओसाड वाटणाऱ्या शाळेचे लोकसहभागातून आज नंदनवन करून एखाद्या खाजगी शाळेला लाजवेल असे उदाहरण त्यांनी उभे केले आहे.मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण,कौशल्य आधारित शिक्षण, तंत्रज्ञान आत्मसात करून देशाची भावी पिढी घडवण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून राजेंद्र परतेकी सर यांनी मागील १५ वर्षांपासून ३६५ दिवस शाळा अविरतपणे सुरू ठेवून राज्यात एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.
परतेकी सरांना या वर्षीचा जिल्हा आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोबतच विविध संस्थानी ५० हुन अधिक ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. निवृत्ती होईपर्यंत याच शाळेत राहणार असा त्यांचा निर्णय आहे.
No comments:
Post a Comment